Tuesday, January 20, 2015

बारा मोटेची विहीर

     साताऱ्यापासून हाकेच्या अंतरावर म्हणजे सातारा रस्त्यावर डावीकडे "लिंब"  गाव आहे.

       या गावात एक शिवकालीन इतिहासाची साक्षीदार अशी 'बारा मोटेची विहीर' आहे.



शिवकालात महाराष्ट्रातील बांधकामांनी एक उंची गाठली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे नव्याने किल्ले बांधले तसेच, अनेक किल्ल्यांची डागडुजीही केली. त्यावेळच्या बांधकामांचा दर्जा आणि त्यातील कलात्मकता केवळ किल्ल्यांतूनच दिसते असे नाही तर या ठिकठिकाणी अन्य प्रकारची दर्जेदार बांधकामे झाली होती. त्यातीलच एक उत्तम नमुन म्हणजे लिंब (जि. सातारा) येथील बारा मोटेची विहीर. ज्यांना ऐतिहासिक बांधकामे पाहण्याचा आणि त्यांचा अभ्यास करण्याची आवड आहे त्यांनी तर ही विहीर पाहिलीच पाहिजे...
Bara Mota Chi Vihir - Sub Well (उपविहीर) - Sept 2014, Rohit Pawar
Bara Mota Chi Vihir - All In One Structure ( Sept 2014) - Rahul Bulbule


  •  इतिहास


ही विहीर संभाजीराजे यांचे सुपुत्र शाहु महाराज(पाहिले शाहु महाराज) यांच्या  काळात या विहिरीचे बांधकाम शके १६४१ ते १६४६ या दरम्यान  विरुबाई  यांनी केले. या विहिरीची खोली ११० फूट असून व्यास साधारण ५० फूट आहे. लिंब गाव परिसरात सुमारे 300 झाडाच्या 'अमराई' च्या पाणी व्यवस्थेसाठी ही विहीर बांधली गेली.




Bara Mota Chi Vihir - Mahaal (Sept 2014) - Rohit Pawar


  • स्तापत्य : (Architecture)

शिवकालीन स्थापत्यशास्त्र, ही विहीर पाहताना थक्क व्हायला होतं, म्हणजे हि विहीर आहे कि भुयारी राजवाडा असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. म्हणजे बघा विहिरीत उतरायला एक आलिशान जिना आणि भव्य कमान आहे, मध्यभागी महाल असून दोन बाजूंनी एक विहिर अणि उपविहिर असं बांधकाम आहे, शिवलिंगाचा आकाराची ही विहीर आहे.उपविहीरीच्या तळापर्यंत जाणाऱ्या पायऱ्या नितळ पाण्यात आजही दिसतात.

अष्टकोनी आकाराच्या विहिरीच्या आतील बाजूस वर चार वाघांची शिल्पे आहेत. यातील दक्षिणेकडील २ वाघांच्या पायात दोन-दोन असे चार हत्ती आहेत तर उत्तरेकडील २ वाघ आकाशात झेप घेत आहेत.
याचा थोडक्यात अर्थ असा की (महाराजांनी) दक्षिणदिग्विजय झाला आहे आहे आता उत्तरदिशेकडे झेप घेणार.






विहिरीस आलिशान जिना आणि आतउतरण्यास दोन बाजूने वाटा आहेत.या विहिरीवर पंधरा मोटा बासवन्याची सोय असून प्रत्यकक्षात बारा मोटा चालत असत असे म्हणतात, नीट लक्ष देवून पाहिल्यास बारा मोटेचे बारा चौथरे नजरेस पडतात.

अष्टकोनी मुख्य विहीर आणि जोडून आयताकृती उप विहीर.या दोन्ही विहिरींना जोडणारी  इमारत म्हणजे चक्क एक महाल आहे.आलिशान जिना उतरून आपण खाली महालाच्या तळमजल्यावर जावून पोहोचतो.
या महालाला मध्यभागी दोन खांब आहेत, प्रत्येक खांबावर वेगवेगळीशिल्पे कोरलेली आहेत.गणपती, हनुमान यांची शिल्पे त्याखाली गजारूढ महाराजांचे शिल्पचित्र. खांबाच्या दुसऱ्या बाजूस अश्वारूढ महाराजांचे शिल्प कोरलेले आहे, त्यावरील बाजूस नक्षीदार फुले आहेत.महालात लाकडी दरवाजे, पदडे लावण्यासाठी लोखंडी रिंगा आजही अस्तित्वात आहेत.

  विहिरीवर १५ मोटांची जागा असली तरी प्रत्यक्षात १२ मोटांतूनच पाणी उपसा होत असे. इतर ३ मोटा दुरुस्ती काळात पर्यायी मोटा म्हणून वापरत .विहिरीसाठी दगड आणावे लागले होते. हे दगड आणण्यासाठी जो गाडा वापरला होता त्याचे चाक आजही येथे पाहायला मिळते. या विहीरीच्या समोर मोडी लिपितील शिलालेखही आहे.


Bara Mota Chi Vihir - Entrance & Door (Sept 2014) - Rohit Pawar



या महालातून मुख्य दरवाजाकडे पाहिल्यास दरवाजावरील कमानिशेजारी दोन शरभ शिल्पे कोरलेली दिसतात.
एवढे सगळे अवशेष पाहून महालाच्या छतावर आलो की सिंहासनाची जागा आणि समोर सभेसाठी बैठक व्यवस्था केलेली आहे. स्वत: थोरले शाहू महाराज तिथे बसायचे.




  •  पोहण्याची मजा
विहिरीतील स्वच्छ पाण्यात पोहण्याचा आनंद घेऊ शकता, परंतु विहीर अतिशय खोल असल्याने काळजी घ्यावी. ज्यांना पोहायला जमत नाही अशांनी पाण्यात उतरू नये.




  •  कसे जाल :
सातारा जिल्हा - तालुका सातारा - लिंब गाव - शेरी विभाग



            पुण्यापासून NH4(पुणे-सातारा-बेंगलोर) हायवे वरुण  साधारण १००किमी अंतरावर डावीकडे 'लिंब फाटा' लागतो.(हा फाटा अनेवाड़ी टोलनाक्या-पासून 3 किमी पुढे आहे ).हायवेपासुन आत २ किमी आत लिंब गाव असून येथून पुन्हा १ किमी अंतरावर उजविकड़ील बाजुस 'शेरी' नावाचा परीसर आहे. येथेच विहीर पहावयास मिळेल.

  • देखभाल                                                       

            रवी वर्णेकर हे गृहस्थ आपल्या कुटुंब-कबिल्या सह आज या विहिरिची देखभाल करतात.इतिहासाच्या पुस्तकात दुर्लक्षित राहिलेली ही विहीर पाहण्याचे भाग्य लाभणे  म्हणजे महाराष्ट्राचे मर्दानी दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आणखी दुसरं काय.एकदा तरी या इतिहासाच्या साक्षीदाराला नक्कीच भेट दया.
माहिती साभार - रवी वर्णेकर ,राहुल धर्माजी बुलबुले आणि  रोहित पवार.

जय जिजाऊ
जय शिवराय

Monday, May 19, 2014

मोदी उदय ,पण पुढे काय ?

शेवटापासून सुरवात करावी तर Most Awaiting 'निकाल' काय लागला हे वेगळं सांगायला नको ,
समस्त भारताच्या इतिहासात लोकांच्या म्हणण्यानुसार जी 'लाट' , नाही ' लाट ' नको 'त्सुनामी' म्हणलं तरी अतिशयोक्ती होणार नाही, तर या लाटेने अगदी मोठे राष्ट्रीय , प्रादेशिक पक्ष ज्या पद्धतीने संपवले त्याचा पूर्व-इतिहास अगदी 'नवा' आहे .




   जो भाजप पक्ष गेले अनेक वर्ष सरकार स्तापणेची स्वप्नं पाहत होतं, ती गोष्ट 'एकट्या ' मोदीने  कशी काय गेल्या १-२ वर्षात साध्य केली असावी ?  यामागे Modi Branding वगेरे वगेरेआलंच , परंतु एकीकडे 'कॉंग्रेस'ची झालेली गत आणि पडलेली पत यातून कॉंग्रेस स्वतः सावरू शकला नाही . याचाच फायदा मोदी वर बनणारे जोक्स, अब कि बार ... चा नारा Youth साठी Daily Dose झाला.

कॉंग्रेस बद्दल सांगायचा झालं तर ,२०१० मध्ये झालेला स्पेक्ट्रम घोटाळ्य पासून झालेली सुरवात न थांबता कोळसा, कॉमनवेल्थ , निर्भया , अण्णा हि सर्व प्रकरण Comman Man च्या लक्षात येत होती.  परंतु कॉंग्रेस ने भाजप वर निशाणा साधला तो 'secularism' वरून , पण सर्वसामान्य नागरिकाला यात काही रुची नसायची, त्याला सिलेंडर, पेट्रोल यांचे वाढलेले भाव याचा राग होता, आणि हाच राग मतपेटीतून बाहेर पडला.




अश्यातच , भाजप ने Marketing Strategy ,भाजप-केंद्रित ऐवजी मोदी-केंद्रित करून  'अब कि बार भाजप...' नसून 'अब कि बार मोदी सरकार ' आणि  'कॉंग्रेस मुक्त भारत ' हा अगेंडा ठेवला, याचा निष्कर्ष म्हणून जनतेने एकट्या भाजप ला २८७ खासदार आणि NDA लं ३३७ खासदार मिळवून दिले. जनतेचा एवढा मोठा कौल , कदाचित भाजप साठी सुद्धा अनपेक्षित होता.
एकेकाळी बहुमतात असणारे बिहार , यु.पी मध्ये असणार्या  (भाजप सोडून गेलेल्या )नितीश  सरकारला  आणि अखिलेश सरकार लं २-३ एवढेच  खासदार मिळाले, याचा परिणाम जनतेला लवकरच राजीनामा शस्त्र मधून दिसेल.

इकडे महाराष्ट्रात देखील परिस्थिती अशीच ओढवली ,मग ते पवारखेळी  असो कि मनसे factor किवा आप सगळे संपले, दुसरीकडे भाजप सोबत असणार्या 'शिवसेनेने' मात्र या मोदी लाटेत नुसते हातच धुतले नाहीत तर पूर्ण आंघोळच केली आणि त्यांचे १९ खासदार निवडून आले.

शेवटी प्रश्न उरतो एकच , पुढे काय ?
मोदी संघाचा रेमोट बनतील ? , भाजप स्वताचं घर सावरतील ? नरेंद्र मोदी हे दुसरे व्लादिमिर पुतीन होऊ पाहतील ? कॉंग्रेस चा झालेला ऐतिहासिक पराभव पचवून आता राहुल ऐवजी 'प्रियांका'चं Launching होणार ?
 निकालानंतर  गायब झालेले पवार यावर काय  खेळी करतात? कारण विधानसभा जवळ येतेय , UP च्या विजयाचा 'सूत्रधार'   'अमित शहा '  म्हणे इकडे येणार आहे.
तोपर्यंत महाराष्ट्रात) राजीनामे नाही पडले तर नवलंच !